पावसाळी सहली साठी पुण्याजवळील सह्याद्रीचे पाच घाट नेमेची येतो मग पावसाळा, श्रावणात घन निळा, नभ उतरु आलं इत्यादी गीत काव्यांमधुन पावसाळ्याच्या अनुपम सौंदर्याला शब्दात बध्द करीत अनेक कवि गीतकारांनी पावसाळ्याला आणखी जास्तच सुंदर केले आहे. मनुष्यमात्र सतत आनंदाच्या शोधात असतो. हा आनंद त्याला अनेक छोट्या मोठ्या गोष्टींमधुन मिळत असतो. मिळत नसेल तरी मनुष्याला हे चांगलेच ठाऊक आहे की आनंद कसा मिळवायचा. प्रत्येकाची आनंदाची अपेक्षा वेगवेगळी असली तरी भारतात मात्र मोसमी पावसाळ्यामुळे प्रत्येकाचा आनंद कित्येक पटीमध्ये वृध्दींगत होत असतो. विशेषतः पश्चिमघाट माथ्यावर बरसणा-या या पावसाच्या धारा सजीवसृष्टी मध्ये नव चैतन्य निर्माण करतात यात शंका नाही. वृक्ष, वेली, झुडपे, गवताची सळसळणारी पाती, किट मुंग्या, गाई गुरे, जंगली प्राणी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेतकरी,,, या सर्वांचा आनंद कित्येक पटीमध्ये वाढत असतो. व हा वृध्दींगत झालेला आनंद दृश्य स्वरुपात आपण अगदी याची देही याची डोळा पाहु शकतो. फक्त त्यासाठी यासा-यांकडे पाहण्याची एक निरलस दृष्टी मात्र आपणाकडे हवी. तुम्ही पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये राहत असाल तर हा लेख तुमच्या साठीच आहे. आज आम्ही तुम्हाला पुण्याच्या जवळ अशा नयनरम्य निसर्गाचे दर्शन, कमीत कमी त्रासामध्ये आणि ट्राफिक जाम शिवाय कसे व कुठे घेता येईल हे सविस्तर व अचुकपणे सांगणार आहोत. पुण्याइतके भाग्यवान शहर कदाचितच इतर कोणतेच नसेल. घाटमाथ्यापासुन साधारण ४० किमी अंतरावर घाटमाथा शहराच्या पश्चिमेला आहे. व पावसाळ्याच्या ख-या सौंदर्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी घाटमाथ्या शिवाय आणखी दुसरी कोणतीही सुंदर जागा दुसरी कोणतीही नाही यात संशय नाही. चला तर बघुयात पुण्याजवळ कुठे कुठे पावसाळी भटकंतीचा मस्तवाल अनुभव घेता येईल ते. तस पाहता पुण्यापासुन १०० किमी अंतराच्या आत अक्षरक्षः ३० ते ४० ठिकाणे आहेत जिथे जाता येउ शकते. या सर्व ठिकाणी सह्याद्रीतील घोंघावणा-या वा-यावर स्वार होणा-या जलधारा आपण नुसत्याच पाहु शकत नाही तर प्रत्यक्ष अंगावर देखील घेऊ शकतो. या प्रत्येक ठिकाणी आपण सगळेच जाऊ शकतो असे नाही. काही ठिकाणी ट्रेकर्स, भटके, रॉक क्लांईबर्स च जाऊ शकतात. तर काही ठिकाणी जाणे जिकीरीचे होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला पुण्याच्या जवळ, तरीही घाटी पावसाचा आनंद घेण्यासाठी जिथे जाता येईल अश्या पाच सह्याद्रीच्या घाटांविषयी सांगणार आहोत. हे पाच घाट म्हणजे सह्याद्रीची पाच रत्नेच आहे जी पुण्यापासुन अगदीच जवळ आणि स्वर्गासम सुंदर आहेत. मढे घाट – अगदी पहाटे पासुन ते मध्यरात्री पर्यंत, पाऊस कसा कोसळतो, आपणासमोर पावसाच्या धारा कशा एका पाठोपाठ ढगातुन धरतीवर पडतात, नद्या, धबधबे कसे दुथडी भरुन वाहतात, हे सगळे निसर्गाचाच एक भाग बनुन अनुभवता येईल या पावसाळी सहलीमध्ये. धबधबा नुसताच पाहणे नाही, हा घाट पुण्यापासुन ७० ते ९० किमी एवढ्या अंतरावर आहे. पुण्यापासुन इथे जाण्यासाठी बेंगलोर हायवे ने. बेंगलोर कडे निघावे व चेलाडी फाट्यापासुन उजवीकडुन, नसरापुर हुन पुढे वेल्हे गाठावे. वेल्ह्यामध्ये चहा नाश्ता करुन, मढे घाटावर जाता येईल. अंतर १७ किमी आहे. इथुन पुढे घाट रस्ता सुरु होतो. रस्ता अरुंद व वळणावळणाचा आहे. पटाईत गाडी चालवणारेच फक्त इकडे गाडी चालवु शकतात. त्यातच पाऊस सुरु असेल तर गाडी चालवणे आणखी अवघड जाते. मढे घाट हा ऐतिहासिक घाट आहे. सिंहगडावर हौतात्म्य आलेले तानाजी मालुसरे यांचा मृतदेह याच घाटाने कोकणात त्यांच्या गावी नेला होता. बोली भाषेत मृतदेहास मढ म्हणतात त्यामुळे या घाटास मढे घाट असे नाव पडले. जुन्या घाट पाय-या अजुन ही इथे दिसतात. यासाठी तुम्हाला थोडे अधिक खाली उतरावे लागेल. पण पावसाळ्यात शक्यतो घाटात खाली उतरणे टाळावे. साधारण १२० फुटांचा जलप्रपात तुम्हाला इथे अगदी समोरुन पाहता येतो. जीवाही काळजी घेत, कसलाही आगाऊ पणा न करता निसर्गाचा आनंद घ्यावा. मागील काही वर्षांमध्ये या घाटात, कड्यावरुन पडुन अनेकजणांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे मद्यपान करुन या परीसरामध्ये फिरकणे टाळा. २४ तास पोलिस देखील असतात इथे त्यामुळे जर कुणी दारु पिताना सापडलाच तर त्याला तुरुंग वारी नक्कीच. रस्ते अरुंद असल्याने शक्यतो १७ सीटर बस पेक्षा मोठी वाहनाने प्रवास करणे टाळा. मढे घाटाची सहल एका दिवसाचीच आहे. पण तुम्हाला जर मढे घाट पाहुन, मुक्काम करायचा असेल व सोबतच वॉटरफॉल रॅपलिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर आमच्या कॅम्प्ससाईटवर तुमचे स्वागत आहे. वॉटर फॉल रॅपलिंगचा थरार काय असतो हे या व्हिडीयो मध्ये पहा. निसर्गशाळा सह्याद्रीच्या कुशीत जरी असली तरी गाडीने तिथपर्यंत पोहोचता येऊ शकते. पुण्यापासुन अगदी ६०/७० किमी अंतरावर असलेल्या या कॅम्पसाईटपासुन राजगड, तोरणा, मधेघाट, उफांड्या घाट, गोट खिंड, रायलिंग पठार, लिंगाणा अशी पुण्यातील रत्ने अवघ्या काही किमी अंतरावर आहे. आयोजकांशी आधीच बोलुन तुम्ही यापैकी एखाद्या ठिकाणी जाण्याचा बेत तयार करु शकता. नळ चालु केल्यावर ज्याप्रमाणे पाणी बदाबदा पडते, त्याप्रमाणे कोसळणा-या पावसात तुमचा टेंट लागलेला असतो. तरीही पाण्याचा एकही थेंब या टेट मध्ये येत नाही. बाहेर थंड वारे घोंघावत असले तरी टेंट मध्ये मात्र उब असते. मध्यरात्री जेव्हा टेंट पडणा-या पावसाच्या थेंबांच्या आवाजाने तुम्हाला जाग येते तेव्हा तुम्हाला जाणवते की तुमच्यापासुन पाऊस फक्त एकच हाताच्या अंतरावर पडत असतो तरीही तो तुम्हाला स्पर्श करु शकत नाही. अशा या भन्नाट पावसाळी सहलीचा आनंद तुम्हाला घेता येईल फक्त निसर्गशाळेमध्येच. मावळातील रानभाज्या – ओळख, गुणधर्म व पाककृती – हा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा. ताम्हिणी घाट – सदा सर्वदा सर्वांच्या आवडीचे मुळशी धरण परिसर पुणेकरांचे सर्वात आवडते व लाडके पावसाळी डेस्टीनेशन म्हणजे मुळशी. मुळशी , ताम्हिणी घाट जरी सर्वांचे आकर्षण असले तरी या एक दिवसीय पावसाळी सहलीनंतर येणारा मनस्ताप व ट्राफिक जाम मध्ये तासनतास कंटाळवाण वाट बघण, पर्यटकांना नकोस वाटत. या ट्राफिक जाम मुळे फक्त पर्यटकांनाच त्रास होत नाही तर स्थानिकांना देखील खुप त्रासाला सामोरे जावे लागते. याला काही पर्याय आहे. असे काही करता येईल का की जेणेकरुन या ट्राफिकच्या समस्येचा त्रास थोडा का होईना कमी करता येईल? होय या ट्राफिक जाम च्या समस्येवर उपाय आहे. तो म्हणजे गुगल मॅप्सच्या मदतीने पर्यायी रस्ते शोधुन त्या पर्यायी रस्त्यांनी प्रवास करणे. कोणते आहेत हे पर्यायी रस्ते. चला तर मग आपण पाहुयात. मुळशीला जाताना फारसे ट्राफीक जाम नसते. मुख्य अडचण होते ती माघारी शहरात येताना. तर शहरात येताना तीन/चार मुख्य ठिकाणी खुप मोठे जाम होत असतात. हे जाम आपण टाळु शकतो. पहिला आहे, पौड गाव. या गावचा ट्राफिक जाम टाळण्यासाठी, मुळशी वरुन माघारी येताना, माले गावापासुन पौड ला न येता, संभवे गावास जावे. संभवे गावातुन सरळ भादस, शिळेश्वर, आसदे,खुबवली, रावडे अशी गावे करीत पौड कोळवण रोड ला यावे. पौड कोळवण रोडला लागल्यावर पौड कडे वळुन, अगदी एक दोन किमी अंतरावरुन लगेच दारवली, आंबडवेट गावाकडे , डावीकडे वळावे. या रस्त्याने सरळ गेलात तर तुम्हाला भरे फाटा लागेल, तेथुन तुम्ही डावीकडे वळा व पुढे हिंजवडी किंवा सुस मार्गे पुणे गाठा. हा रस्ता सुरुवातीपासुन संभवे पासुन काही ठिकाणी खराब जरी असला तरी तुमचे ट्राफीक मधील किमान तीन तास वाचवु शकतो. या पर्यायी रस्त्याने तुम्ही पौड, घोटावडे फाटा, पिरंगुट, भुगाव, चांदणी चौक या सगळ्या ठिकाणचे ट्राफिक टाळु शकता. ट्राफिक टाळल्यामुळे नक्कीच