मग सुरु झाली संगीत रजनी. गायत्री सप्रे-ढवळे आणि कुमार करंदीकर यांनी रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात , स्वर्गीय सुखाची रेलचेल असणा-या चंद्रमाधवीच्या प्रदेशात नेण्याचा जणु चंगच बांधला होता जणु. हा प्रवास, चंद्रमाधवीच्या प्रदेशाकडे जाण्याचा हा प्रवास संगीत सुरांचाच नुसता नव्हता बर का !
मध्यंतरानंतर सुनिलजींनी बासरीविषयी अधिक माहिती देत अनेक प्रकारच्या बासरी कश्या असतात ते दाखवले , वाजवुन देखील ऐकवले आणि त्या त्या बासरीचा कोणत्या काळी कधी कसा वापर लोकसंगीत असो वा सिनेमा संगीत असो त्यात झाला ते प्रत्यक्ष वाजवुन दाखवले.
आणि निसर्गशाळेची ही दुसरी सहल ठरली. त्यावेळी निसर्गशाळेत माळरानाशिवाय अन्य काहीच नव्हते. पावसाळ्यातच केवळ सुंदर, विलोभनीय दिसणारी निसर्गशाळा उन्हाळ्यात हकास व्हायची. झाडे नव्हती, हिरवे छत्र अजिबात नव्हते. एकही साधे पत्र्याचे छप्पर देखील नव्हते. टॉईलेट नव्हते..
असे ता-यांचे गाव करण्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे अनेकाम्च्या प्रयत्नांची गरज आहे. सोबतच असे उत्साही , नवनवीन गोष्टी शिकण्यास उत्सुक तरुणांची गरज आहे की जे आकाशदर्शन, खगोल शिकतील. पण यांना शिकविणार कोण बरे? तर आम्ही म्हणजे निसर्गशाळा ही जबाबदारी घेण्यास उत्सुक आहोतच.