Whats is a “देवराई”? Its the flora and fauna preserved by the people of the land for centuries in the name of god. We have almost 6 such groves in the perimeter of 10 kms of our camping sites. Many campers ask me what is this “देवराई” . Here is some light on what it really is and how such practices make us unique globally. When the world realized, the threat of global warming, deforestation, our ancestors already have been learning and teaching generations to preserve,protect the ecosystem for thousands of years. Lets understand what’s this.. To make the environment sustainable, a number of measures are necessary to be taken up by the people and government across the globe. Some of these measures are- use of efficient and eco-friendly technologies, sustainable use of resources and adoption of indigenous practices like keeping of sacred groves. Here in the current article we are going to discuss about sacred groves, their meaning, importance and practices. The word sacred means: considered to be holy or ‘connected with a god’ and the word ‘Grove’ means: a small area of land with trees of particular types grown on it. Thus by combining these two words the final dictionary meaning of the couple of words Sacred Groves is: “A small area of land with particular types of trees grown on it and that are considered to be holy by the local human community. In other words Sacred Groves can be defined as below- An area with particular types of trees dedicated to local deities or ancestral spirits that are protected by local communities through social traditions and taboos incorporating spiritual and ecological values are called as sacred groves. Indian Practice of keeping Sacred Groves The presence of sacred groves of India has been documented since the early 1800s. Sacred Groves of India comprise trees like Deodara (Cedrus deodara), considered to be the “abode of Gods” Sal (Shorea robusta), Rudraksha (Elacocarpus species), Bael (Aegle marmelos), and Ashok (Saraca asoca), and kadam (Anthocephalus kadamba), Pipal (Ficus religiosa), Neem (Azadirachta indica), Banyan tree (Ficus benghalensis): native to India, Mango tree (Mangifera indica) and bushes like, Basil (Ocimum basilicum & Ocimum minimum) (native to India and Iran) and grass like Doob or Durva (cynodon dactylon) etc. See a video of our guests, involved in an activity of One with Nature @ a Devrai, the sacred grove near Pune To visit such sacred grove, and also to have best ever camping experience, Let’s go camping
गिरिप्रेमीने नुकताच कातराबाईचा कडा प्रस्तरारोहन करुन सर केला. यशदिप देखील या मोहीमेमध्ये सहभागी होता. या प्रस्तरारोहण मोहीमेचे संपुर्ण चित्रीकरण करण्यात आले होते. व यथावकाश सर्व आरोहकांचे कौतुक करण्याचा कार्यक्रम सोहळा झाला व त्यामध्ये या मोहीमेचे संपुर्ण चित्रीकरण/ फिल्म दाखवण्यात आली. कातराकडा आणि सह्याद्रीतील एकुणच सगळेच कडे कसे आडदाम्ड, उभे-आडवे विस्तारलेले, सरळसोट, रौद्र, भयावह आहेत याचे दर्शन या फिल्म मध्ये झाले. त्यातच एक भयानक अपघात देखील याच फिल्म मध्ये दाखवला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कुणालाही काहीच इजा झाली नाही. किरकोळ खरचटले मात्र. आरोहक कड्यावर वर वर चढण्याचा प्रयत्न करीत असतानाच, प्रमुख आरोहक कड्याच्या ज्या भागाला चिकटलेला होता तो संपुर्ण कड्याचा भागच निखळुन खाली पडला. तो पडताना नेमका खाली उभ्या असलेल्या आरोहकाला घासुन, आणखी खोल दरीत कोसळला. आणि खाली म्हणजे दुस-या क्रमांकावर जो आरोहक होता तो म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसुन माझा मित्र यशदिप. या फिल्म मुळे आणि यशदिप वर गुदरलेल्या या भीषण अपघातामुळे कातराकडा पाहण्याची अतीव इच्छा निर्माण झाली होती. २००१ च्या उन्हाळ्यात आम्ही दोघांनीच रतनगड भटकण्याचे ठरवले व आम्ही निघालो. आम्हा दोघांचा नुकताच बेसिक माऊंटेनियरींग चा कोर्स झालेला होता. वय उमेदीचे होते. आनंद पाळंदेंचे डोंगरयात्रा म्हणजे आमची भगवदगीताच. त्यातील रतनगड ट्रेकच्या पानाचे व नकाशाचे झेरॉक्स करुन घ्यायचे, पुस्तकातील तो तो पाठ अनेकदा वाचायचा व मार्ग ठरवुन सुरुवात करायची. या शिवाय अन्य कसलीही साधने उपलब्ध नव्हती. आमचे नशीब चांगले की आमच्या आधीच्या पिढीने किमान तेवढे तरी करुन ठेवले होते. ज्यावेळी पाळंदे प्रभृती भटकत असतील तेव्हा त्यांच्याकडे तर पुर्वतयारी असे काहीही नव्हते. फक्त नाव तेवढे ठाऊक असायचे. त्यांनी असेच करीत करीत आख्खा सह्याद्री पाहिला, अनुभवला. एवढेच करुन ते थांबले नाहीत, तर त्यांना आलेल्या अनुभवांची शिदोरी देखील पुस्तक रुपाने आमच्या पिढील दिली, की जिच्या जीवावर आम्ही थोडेफार भटकु शकलो. त्यांच्या अनेक पुस्तकांमधुन अनेक किल्ले, कडे, पर्वत यांच्या विषयी सविस्तर माहिती त्यांनी नोंदली. नकाशे बनवले. वास्तु विशेषांची ओळख केली व ती देखील नोंदवुन ठेवली. वाटा-आडवाटा-माकडवाटा-चोरवाटा-फसव्या वाटा या विषयी लिहुन ठेवले. गडांवर पाण्याची स्थाने किती, कुठे हे सर्व लिहुन ठेवले. त्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये कोणत्या ऋतुंमध्ये पाणी उपलब्ध असते व ते पिण्यासाठी उपयोगाचे आहे की नाही हे देखील त्यांनी नोंदवुन ठेवले. राज्य महामंडळाच्या बसचे मार्ग, त्यांच्या वेळा हे सर्वच्या सर्व त्यांनी सविस्तर लिहुन ठेवले जेणेकरुन पुढच्यांची सोय व्हावी. असो. तर डोंगरयात्राचा अभ्यास करुन आम्ही रतन गड भटकंती योजली. आम्ही सतरा-अठरा वर्षांची पोरे होतो त्यावेळी. ईगतपुरी हे नाव पुस्तकात वाचुन ते म्हणजे फार फार दुर , अगदी मध्यप्रदेडामध्ये असलेले एखादे शहर आहे की काय आणि आपण एवढ्या दुर देशी जाणार आहोत, असे वाटले होते. आणि त्याकाळी सर्व प्रवास लाल डब्यानेच व्हायचा. दुसरे पर्यायच नव्हते. त्यामुळे पुण्यापासुन निघुन आम्ही रतनवाडीला पोहोचेपर्यंत जवळजवळ आठ तास आम्ही एस टी बस मध्येच होतो. एसटी बस ची एक विशिष्ट संस्कृती होती. आणि आमच्या सारखे कधीतरीच म्हणजे भटकंतीलाच एस टी बस मध्ये बसणारे देखील आपोआपच्या त्या एसटी बसच्या संस्कृतीशी जोडले जायचे. त्या बस प्रवासातील पुण्यापासुनचा प्रवास मला विशेष आठवतो, कारण आम्हाला बस मध्ये बसण्याला जागाच मिळाली नाही. तुडूंब भरलेली बस. अगदी चेंगराचेगंरीच. त्यातच आमच्या भल्यामोठ्या पाठीवरच्या पिशव्या. दररोजच्या जीवनसंघर्षात संकटांशी दोन हात करीत, ज्यांचे पाठ आणि पोट एक झालेले होते असे ते ग्रामीण लोक जेव्हा आमच्या पाठीवरच्या त्या भल्यामोठ्या पिशव्या पाहत तेव्हा त्यांतील काहींना असे वाटत असावे की हे आले बघा खुळे! डोंगरद-या फिरायला येतात. काय ठेवलय जणु त्या दगडधोंड्यांत. तर काहींना आमच्या पिशव्या पाहुन आमच्या विषयी थोडे अप्रुप वाटत असावे असे त्यांच्या चेह-याकडे पाहुन समजायचे. आमच्या सारखे भटके पाहणे त्यांना काही नवीन नसायचे. तर आमच्या पाठीवरच्या त्या मोठाल्या पिशव्यांमुळे आम्हाला उभे राहण्यासाठी देखील जागा मिळाली नव्हती. पर्याय नसल्याने ड्रायव्हर काकांनी आम्हाला त्यांच्या केबिन मध्ये घेतले. केबिन कसली राव ती. भट्टीच म्हणा की! आमच्या बुडाखालीच इंजिनची करकर,डरडर,घरघर आणि त्यातुन येणा-या झळा. आणि डिझेलचा वास तर विचारुच नका. कसे काय ते ड्रायव्हर मंडळी एवढे लांबचे पल्ल्याचे अंतर गाडी चालवीत असतील हे देव जाणो अथवा ते ड्रायव्हरच. जसजशी गाडी एकेक थांबा घेऊन पुढे जाऊ लागली तसतशी मागे गाडीत जागा होऊ लागली. पिशव्या तशाच तिथे ठेवुन आम्ही, संधी मिळताच मागे जाऊन उभे राहिलो. पण दोन-अडीच तास तरी आम्ही असे ड्रायव्हर शेजारी बसुन घालवले असतील. नकोसे झाले होते तेव्हा अगदी! रतनवाडीला पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती. प्रत्यक्ष प्रवासातील आठ आणि बस बदलण्यासाठी स्थानकावर वाट पाहण्यात तीन तास असा आमचा पुर्ण दिवस नुसता एस टी/ एसटी आगारामध्येच गेला. मंदिर परिसरामध्ये एक ओसरी पाहुन आम्ही आमचे बस्तान मांडले. आम्हाला विचारायला कुणीही आले नाही. कारण त्यावेळी त्या गावांमध्ये , गावचे गाव पण होते. लोक आठ वाजेपर्यंतच जेवन उरकुन निजुन जात. अगदी एखाद दुसर चुकारीचा माणुस कधीमधी चौकशीला यायचा. व तो देखील काही मदत हवी आहे का पोरांना हे पाहण्यासाठीच यायचा. पण या वेळी मत्र कोणीच आले नाही. आम्ही सोबत आणलेली चपाती, शेंगदाण्याची चटणी खाऊन, पाय पसरले. प्रवासाचा शीण भयंकर होता त्यामुळे तातडीने झोप लागली. ज्यावेळी आम्ही इथे पोहोचलो तेव्हा भयानक अंधार असल्याने, आम्ही कुठे, कसल्या प्रदेशात आलो आहोत या विषयी काहीच कल्पना नव्हती. पहाटेला वस्तीतील कोंबड्यांच्या आरवण्याने लवकरच जाग आली. मंदीरात घंटा अधुन मधुन वाजत होती. कदाचित कुणीतरी पहाटे पहाटे दर्शनाला आले असावेत. जसजसा आसमंत प्रकाशित होऊ लागला तसतसा आम्हाला तो परिसर देखील प्रकाशित झालेला आम्हाला दिसला. घाटमाथा म्हणजे खुप जास्त पावसाचा भाग, इथे पाऊस तीन महिने नुसत पडतच असतो त्यामुळे मंदिराचे रंगरंगोटीचे काम सुरु असलेले आम्हाला सकाळच्या प्रकाशात दिसले. नंतर हे देखील समजले की हे काम पुरातत्व खात्यामार्फतच सुरु होते. सकाळचा चहा आणि नाश्ता आम्ही स्वतः बनविला. त्यासाठी थोडीफार लाकडे गोळा करावी लागली. चुल मांडुन आधी दुध पावडर पासुन दुध बनवुन घ्यावे लागायचे मग प्रत्यक्ष चहा. नाश्ता व जेवण बनविण्यासाठी आम्ही घरुन शिधा न्यायचो (अजुनही नेतो) . भाजलेला रवा, साखर, हळद, तिखट, मीठ अशी या शिध्याची एक यादीच आमची बनायची प्रत्येक ट्रेकच्या काही दिवस आधी. त्या सकाळी आम्ही गोड शिरा बनवला. नेहमीप्रमाणे शिरा चिकट चिकट झाला. साखरेचा अंदाज नेहमीच चुकायचा. पण त्यातही गोडी असायची, न्यारी चव असायची. तोंडावार थोडासा पाण्याचा शिडकावा करुन, सर्वात आधी मंदीर पाहिले. अतिशय सुंदर, सुबक असे ररतनवाडीचे मंदीर प्राचीन आहे. शिल्पकला, भिंतीवरील कोरीवकामे, मुर्तीकला अप्रतिम आहे. हल्ली सोयी वाढल्या आहेत तिकडच्या त्यामुळे जाणे-येणे, जेवण-खाण, मुक्काम आदी गोष्टी सोप्या झाल्या आहेत. ज्यांनी कुणी पाहिले नसेल हे मंदीर त्यांनी अवश्य पहावे. ट्रेकींगचा आणखी एक अलिखित नियम आम्ही ज्येष्टांकडुन शिकलो. तो म्हणजे पाण्याचा वापर कमीतकमी करणे. माझे शिक्षक गुलाब सपकाळ, यांचा तर नेमच होता ट्रेक पुर्ण होईपर्यंत चेह-याला पाणी लावायचे नाही. नेम म्हणजे नेमच. त्यात त्यांनी कधीही बदल केला नाही. त्यांचे ट्रेकींगचे कपडेदेखील ठरलेले असायचे. पुर्ण बाह्याचा सुताचा एक सदरा मला आठवतोय. हा सदरा फक्त ट्रेकिंगसाठीच ते
We humans are nothing but an integral part of the nature, just like all other creatures incluging huge animals to micro-organisms. We are just like them. We have little upper hand as we can relate to past and draw assumptions to make future even better. And if we use this ability in right way we can take the entire world including all human beings and every single element in the nature to whole new height of harmony. If at all there is any creator, it must have thought of a big role to be played by human being in nature. Are we really playing the role of peace and harmony keeper in nature? A big question, isn’t it! We have even forgotten the basics, the roots of ours so no wonder we have already forgotten the noble role, awaiting for us to be acted upon. We have even forgotten that we are fundamentally nature. We are not something other than nature. If we restore these principles in life, our lives would thrive. Generations would feel the amazing ability to lead lives in peace and harmony. Today I am talking only about lives of human being however that’s not it! Let me tell you some fundamental benefits of being into the nature. We are quite away from these benefits now a days. We are on the verge of losing them forever. Common men and women, must learn these benefits so that, everybody in the society can benefit from those. Nature deficit disorder exists, and most of us have it. Richard Louv is a person I look up to all the time. He coined the term “nature deficit disorder” to describe the social, behavioral, and health consequences of alienation from the natural world. Although scientists are just beginning to understand the health impacts of urban, mostly indoor living, one thing is clear — we need to put down our devices and get outside. It’s good for your heart (mind) Japanese researchers have shown that forest bathing, the practice of sitting in the forest, lowers your blood pressure, pulse, and heart rate variability. It has also been shown to decrease stress hormone levels. We at nisargshala, do this activity for our guests. They feel the peace deep inside. You’re less likely to be overweight I am a good example of this. I was trapped in corporate living and overgrown my body weight to everyones surprise. In last two years, I am on the path of “Lets get outside” and the results are just amazing. In both kids and adults, access and exposure to nature has been shown to lower the risk of obesity. This relationship is most likely due to increased physical activity. Additional studies show that forest bathing decreases blood sugar and cortisol, both of which are also associated with obesity. Other precious benefits – You’ll be happier and improve your memory People who live close to nature experience less anxiety and depression. Walking in nature has been shown to improve mood and short-term memory in people with depression, as well as decrease rumination (repetitive, negative thoughts) and brain activity associated with mental illness. You’ll fight off illness more efficiently Again, let quote here, my own example. The last I was in ill-health, was in 2017. Not even seasonal illness could put me to rest in bed. Exposure to nature improves immune system function in otherwise healthy people, increasing the production of natural killer cells, an important part of our defense against viruses and cancer. We do better In children, time spent in natural settings decreased ADHD (attention deficit hyperactivity disorder) symptoms. In adults, contact with nature improves focus, concentration, and work productivity. And for adults, it results in better productivity at work. Benefit of exercise without doing any Being outside is good for your health, even without the benefit exercise. But if you do choose to exercise in nature, studies show that you’ll feel a greater sense of revitalization, energy, enjoyment, and satisfaction. Nature is painkiller Just looking at nature scenery in a photo or out a window can reduce our experience of pain. Harmonize with nature’s rhythms Being outdoors, and away from artificial lights, helps synchronize your biology to natural circadian rhythms. Scientists investigating chronobiology, the study of biological rhythms, have shown that our connection to natural light/dark cycles helps to regulate our sleep, our moods, our stress levels, and our hormones. Indeed, feeling of gratification Setting aside artificial stimulation and immersing yourself in nature makes you more aware of your surroundings. You hear the rustle of leaves, the creaking of leaves, and the songs of the birds. It’s mindfulness meditation at its most simple. To our good luck, Pune is such a beautiful city, surrounded all round by amazingly striking natural world. If you keep exploring every weekend, it will take almost three years for you to see all the places. You can get most of these benefits even with sporadic exposure to nature. Even if you can only get out of the city infrequently, it will improve your health in countless ways. What are you waiting for? Regards Hemant S Vavale – 9049002053 Note – Author is engaged in offering nature experiences with the help of different activities in nature. Every weekend he organizes camping event near Pune, in Velhe. These excursions focus on posing direct; Guided experiences to men, women and kids from City, such as camping, hiking, trail walking , heritage walks, heritage hikes, stargazing, One-with-nature, adventure, etc.
आपण म्हणतो की मनुष्य एक समाजप्रिय प्राणी आहे. सोशल स्पेसीज! आपण खरोखर असे समाज-शील , समुहात राहणारे, एकमेकांना पुरक राहिलो आहोत का? एक मनुष्य म्हणुन खरतर प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. परिस्थिती उत्साहवर्धक जरी नसली तरी अगदीच निराशावादी चित्र नाहीये हे मात्र नक्की. कारण मनुष्य जसा समाजशील आहे तसाच तो निसर्गातील इतर घटक, प्राणी यांच्याकडे पाहुन आजवर खुप काही शिकला आहे. सध्या शिकत आहे आणि भविष्यात देखील शिकत राहिल यात शंका नाही. पण त्यासाठी आपण निसर्गाशी जोडलो गेलो तरच हे शक्य होईल. खालील व्हिडीयो मध्ये दिसणारे दृश्य सह्याद्रीमधील भटक्यांसाठी काही नवीन नाहीये मित्रांनो. ज्याने ज्याने एखाद-दोन जरी ट्रेक सह्याद्रीमध्ये केले असतील त्यांना हा मुंग्यांचा गड नक्कीच दिसला असेल. आम्ही ज्या डोंगर भटक्या ज्येष्टांकडुन ट्रेकींग करायला शिकलो त्यांच्या कडुन आम्हाला या रचनेला ‘गड-मुंगी’ म्हणतात असे समजले. याची विशिष्ट रचना, की जी एखाद्या अभेद्य किल्ल्याच्या तटबंदीसारखी, वर्तुळाकार तटांची बनवलेली असते, ती खरतर वास्तु-स्थापत्या मधील एक अदभुत नमुना आहे. मध्यवर्ती एक द्वार असते, साधारण ३ इंच त्याच्या परिघ असेल. हेच या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार होय. यातुनच आत-बाहेर ये-जा केली जाते. य द्वाराच्या ऊंची सर्वात जास्त असते. जमीनीपासुन साधारण आठ इंचापर्यंत उंची मुख्य द्वाराची असु शकते. त्या भोवताली एखाद्या पाकळ्यांप्रमाणे एका आड दुसरा, मग तिसरा मग चौथा असे तट, ऊंची कमी कमी असलेले बनवलेले असतात. जर असा गड एखाद्या उतारावर असेल तर चढाच्या बाजुने प्रत्येक तटाची ऊंची जास्त असते व उताराकडे ती कमी झालेली असते. या गडांची बांधणी या मुंग्या मुख्यत्वेकरुन पावसाळ्यामध्येच करतात. या बांधकामासाठी सभोवतालची माती मुंग्य गोळा करतात. एक मुंगी ती केवढी आणि तिच्या मुखामध्ये केवढे अशी माती, ती आणु शकणार बरे? इवलासा मातीचा कण प्रत्येक मुंगी घेऊन येते आणि वेगवेगळ्या तटांवर लावते. अभ्यासकांच्या मते, या मातीच्या कणामध्ये मुंग्या त्यांच्या तोंडातुन लाळ किंवा तत्सम द्रव मिसळुन, त्या मातीला चिकट पणा आणीत असाव्यात. या व्हिडीयो मध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की ज्या तटांचे काम पुर्ण झालेले आहे ते तट चकचकीत, गुळगुळगुळीत आहेत. अगदी प्लास्टर केलेल्या भिंतीसारखेच. व बाहेरच्या तटांचे काम अद्याप सुरु असल्याने ते तट तुम्हाला थोडे खडबडीत दिसतील. या विशिष्ट रचनेचे प्रयोजन काय असावे बरे? पावसाच्या पाण्यामुळे जमिनीखालील मुंग्याची वसाहत व्यवस्थित रहावी हेच या रचनेचे मुख्य प्रयोजन असावे असे वाटते. वेगवेगळ्या तटांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या देखील, आणखी बाहेरच्या तटात उघडताना दिसतात. कदाचित पावसाचे पाणी जर पडले तर ते या तटीय रचनेमुळे बाहेर बाहेरच्या तटांत जाऊन शेवटी गडाबाहेर जावे यासाठीच या रचनेचा हेतु असावा. आपल्याकडे मराठी भाषेत या मुंग्यांना वेगळे काही नाव आहे असे ऐकिवात नाही. इंग्रजी मध्ये या मुंग्यांची ओळख Pheidole sykesii अशी केली गेली आहे. या ओळखीमध्ये देखील अद्याप एकमत नाहीये. बायोडाव्हरसिटी लायब्रेरीच्या एका पुस्तकात या मुंग्यांचा उल्लेख सापडतो. या व्यतिरिक्त डोंगर भटक्यांना जर या गड-मुंग्या व त्यांच्या गडा विषयी अधिक माहिती असेल , भविष्यात उपलब्ध झाली तर अवश्य आम्हाला पाठवा. तुमच्या नावासहीत ती माहिती या पानावर संग्रहीत केली जाईल. पहा गड-मुंगीचा हा व्हिडीयो. आवडल्यास नक्की फॉरवर्ड/शेयर करा. धन्यवाद हेमंत सिताराम ववले निसर्गशाळा पुणे
आपल्या सह्याद्रीची ओळख म्हणजे त्याचे बेलाग सुळके, अतिखोल द-या ,श्वास रोखायला लावणारे कातळ कडे. सह्याद्रीची ओळख म्हणजे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभारलेले, गगनचुंबी अभेद्य गडकोट. सह्याद्रीची ओळख म्हणजे इथली हजारो वर्षांची महान संस्कृती. सह्याद्री ची ओळख म्हणजे याच संस्कृतीतुन जन्माला आलेले एक लोकोत्तर नर-रत्न – छत्रपती शिवाजी. सह्याद्री ची ओळख म्हणजे शिवाजी राज्यांच्या सोबत, कधी कधी त्यांच्याही पुढे जाऊन, प्राणांची बाजी लावणारे सह्याद्रीचे लाखो करोडो सुपुत्र म्हणजे मावळे. सह्याद्रीची ओळख म्हणजे त्याच्या अंगाखांद्यावर उगम पावुन, पुर्व दिशेचा लाखो-करोडो हेक्टरचा प्रदेश सुपीक करणा-या नद्या. सह्याद्रीची ओळख म्हणजे कातळ कड्यांवरुन बेधुंद होऊन, खोलवर द-यांमध्ये उड्या घेणारे, स्वतःला झोकुन देणारे हजारो धबधबे. सह्याद्रीची ओळख म्हणजे इथला मोसमी, बहारदार पाऊस. सह्याद्रीची ओळख म्हणजे… सह्याद्रीची ओळख नव्याने माझ्या सारख्या भटक्याला अगदी रोज होत असते. जेव्हा जेव्हा मी निसर्गात, सह्याद्रीच्या राकट प्रांगणात जातो तेव्हा तेव्हा, मला सह्याद्री नव्याने ओळख होत असते. सह्याद्री नित्य-नुतन जरी मला वाटत असला तरीही, मित्रानो माहितीये का तुम्हाला की सह्याद्री जगातील सर्वात वयोवृध्द डोंगररांगांमधील एक आहे. सुमारे १५ करोड वर्षांचा आहे बरका आपला लाडका सह्याद्री. म्हणजे १५ करोड वर्षांपुर्वी सह्याद्री (दख्खन पठारासहीत) आशिया खंडाशी जोडला गेला. त्यापुर्वी म्हणजे अंदाजे ४० करोड वर्षांपुर्वी पृथ्वीवर एकच भुखंड होता. मागील शतकातील एक भु-शास्त्रज्ञ आल्फ्रेड वेगेनेर यांनी त्यांचे सगळे आयुष्य खंडांतराच्या (खंडांतर हा मी योजलेला शब्द आहे याला इंग्रजी मध्ये Continent Drifting असे म्हणतात) अभ्यासासाठी वेचले. वेगेनेर यांनी पृथ्वीवरील सर्वात जुन्या, एकमेव असलेल्या भुखंडाला पॅंजेया/पॅंगईया म्हणजे संपुर्ण पृथ्वी असे नाव दिले. साधारण पणे ४५० करोड वर्षापुर्वी, अंतरिक्षामधील धुळ, वायु व इतर अंतरीक्षीय घटकांमुळे पृथ्वीची निर्मिती झाली. त्याच दरम्यान सुपरनोव्हा म्हणजे महाभयंकर विस्फोटामुळे, पृथ्वीचे तापमान वाढुन, धुळीने तयार झालेला तो गोळा वितळला. त्यालाच आपण ज्वालामुखी म्हणतो. हा ज्वालामुखीच जसजसा प्रवाही झाल त पासुन प्रत्यक्ष खडक, पर्वत, डोंगर तयार झाले तेव्हा पृथ्वीवर एकच भुखंड तयार झाला. एकच असलेला हा भुखंड काही काळाने तुटला व अनेक छोटे-मोठे भुखंड वेगवेगळे होऊन पृथ्वीवर विखुरले गेले. खरतर हा खुप मोठा विषय आहे. याविषयी आपण कधीतरी पुन्हा सविस्तर माहिती घेऊ . खालील व्हिडीयो पहा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल, सह्याद्री व हिमालय कसा अस्तित्वात आला. वर मी सह्याद्रीस वयोवृध्द म्हणालो याचे कारण असे की, हिमालय पर्वत रांग की जगातील सर्वात उंच पर्वतरांग आहे, ती भारतीय उपखंडाची व आशिया खंडाची धडक झाल्यानंतर अस्तित्वात आली आहे. हिमालयाचा जन्म त्या मानाने खुप अलीकडचा आहे. म्हणुनच सह्याद्रीस मी वयोवृध्द डोंगर असे म्हणतो. सह्याद्रीच्या पुरातन असण्याच्या खाणाखुणा आपणास सह्याद्रीच्या कातळाकड्यांकडे पाहुन दिसतात. नुकताच मी, साल्हेर सालोटा या गडांना भेट देऊन आलो. यातील सालोटाचे कातळ कडे तुटण्याच्या मार्गावर आहेत. एखादा हलका भुकंप देखील सालोट्याचा भुगोल बदलुन टाकेल. अशीच काहीशी अवस्था आपणास सह्याद्री उत्तुंग सुळक्यांची झालेली दिसते. आपल्या मुळशी वेल्हे तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजेच मावळ भाग हा सह्याद्रीचाच भाग होय. मुळशीतील ताम्हिणी म्हणजे हंगामी पावसासाठी भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. तशीच अवस्था भोर – वेल्ह्यातील मावळ पट्ट्याची आहे. कित्येक ठिकाणी पर्जन्यमापकाची उपलब्धता नसल्याने वास्तविक पर्जन्यमान कुठे किती होते याची माहिती मिळत नाही. पण मावळ पट्ट्यात तीन-तीन चार महिने सुर्यनारायणाचे दर्शन होत नाही. काहीशे वर्षांपुर्वीपर्यंत इथे वर्षावने होती. ही जंगले इतकी घनदाट होती की उन्हाळ्यामध्ये देखील सुर्यकिरणे जमिनीवर पडत नसत. किर्र्र झाडी, महाकाय वृक्ष, तितक्याच मोठाल्या, जाडजुड, पुरातन वेली हे सारे सह्याद्रीला एका विशिष्ट ऊंचीवर नेऊन ठेवते. सह्याद्रीतील किल्ले हे जितके उत्सुकतेचा विषय आहे तितके जास्त कुतुहलाचा विषय आहे सह्याद्रीतील वनसंपदा. या वनसंपदेमध्ये, दरी-खो-यात, नद्या-नाल्यांत, कातळ-कड्यांवर, धबधब्यांवर, मोकळ्या माळरानांवर एक आख्खी सजीवसृष्टी गेली लाखो वर्षे जगत आहे, हे आपणास ठाऊक आहे काय? नाचणारा बेडुक नावाची एक बेडकाची प्रजाती आहे, ही प्रजाती किमान सात लक्ष वर्षांपासुन सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर नांदते आहे. सरीसृप, उभयचर, जलचर अशा अनेक प्रजाती इथे लक्ष-लक्ष वर्षांपासुन नांदत आहेत. मनुष्यास या सर्वांविषयी जेवढे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त ज्ञान आपण अजुन मिळवायचो आहोत. आपण अनभिज्ञ आहोत. भारताच्या एकुणच हवामानावर परिणाम करणारा मॉन्सुन म्हणजे मोसमी पाऊस भारतात पडतो याचे कारण फक्त आणि फक्त सह्याद्री आहे. एकेकाळी सजीव सृष्टीसाठी नंदनवन असणारा सह्याद्री वर्तमानात सजीवांसाठी शाप ठरत आहे. सजीव म्हणताना मी यांत मनुष्यास देखील मोजले आहे. आज भलेही अज्ञान, दुर्लक्ष इत्यादी कारणामुळे मनुष्यास वाटत असेल की तो सुरक्षित आहे, पण वस्तुस्थिती तशी नाहीये. व याचे संकेत युनेस्को द्वारे काही वर्षांपुर्वी दिले गेले आहेत. जगातील आठ जागतिक वारसा असलेल्या स्थळांच्या यादीमध्ये सह्याद्रीला स्थान देण्यात आले आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर कित्येक सजीव नांदताहेत मित्रहो. फुले येणा-या वृक्ष-वनस्पतींच्या एकुण ७४०२ प्रजाती सह्याद्रीमध्ये आहेत. फुले न येणा-या वनस्पतींच्या अंदाजे १८०० प्रजाती आहेत.सस्तन प्राण्यांच्या १३९ प्रजाती आहेत. पक्षांच्या ५०८ प्रजाती आहेत. १७९ उभयचर, ६००० किटकांच्या प्रजाती, २९० गोड्यापाण्यातील माश्यांच्या प्रजाती आहेत. इथल्या जंगलांची आणखी एक खासियत अशी आहे की, ही जंगले सदाहरीत आहेत. झाडा-झुडूपांच्या इतक्या प्रजाती आहेत की काही झाडांची पाने जरी काही काळापुरती गळली तरी एकुण जंगल मात्र हिरवेगारच दिसते. तुम्हाला हे पहायचे असेल तर याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कोकण दिवा या ट्रेकचा व्हिडीयो अवश्य पहा. सह्याद्री आणि मॉन्सुन चे जसे नाते आहे तसेच नाते सह्याद्री व दुर्मिळ होत असलेल्या प्रदेशनिष्ट (Endemic) प्रजातींचे आहे. जागतिक दृष्टीने पाहिले तर नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातीपैकी ३२५ प्रजाती सह्याद्रीमधील आहेत. ही अत्यंत दुखःद गोष्ट आहे. या ३२५ प्रजातींमध्ये २२९ प्रजाती वृक्ष-वनस्पतींच्या, ३१ प्रजाती सस्तन प्राण्यांच्या, १५ पक्ष्यांच्या, ४३ उभयचर, ५ सरपटणारे व एक मासा आहे. यापैकी ५१ प्रजाती कदाचित त्यांच्या अखेरच्या काही पिढ्यांमध्ये आहेत. निसर्गाशी मानवी नाते, काहीशे वर्षांपुर्वीपर्यंत तरी सौहार्दाचेच होते असे मी म्हणु शकतो. याचे कारण असे की, मावळ भागातील काही लोकरिती मनुष्य व निसर्ग यातील सौहार्द दाखवणा-या आपणास पहावयास मिळतात. उदा – जेव्हा जुन जुलै मध्ये पावसाला सुरुवात होते, तेव्हा मोठ्या नद्या, धरणांतील मासे अंडी सोडण्याकरीता, नदीच्या उगमस्थानाकडे पोहण्यास सुरुवात करतात. नदीच्या प्रवाहाच्या उलट दिशेने ते पोहतात. हजारो वर्षे मावळात राहणा-या मावळ्यांना, माश्यांच्या या प्रवासाविषयी माहिती अगदी पुर्वापार आहे. असे उलट दिशेने पोहणारे मासे पकडणे व खाणे खुपच सोपे काम आहे. तरीही मावळातील मंडळी, अंडी सोडण्यासाठी प्रवाहाच्या उलट दिशेने जाणारे मासे पकडत नाहीत व खात ही नाहीत. हेच मासे जेव्हा, अंडी सोडतात व पुनः प्रवाहासोबत पोहण्यास सुरुवात करतात तेव्हा, विशिष्ट पध्दतीचे बांबु व लाकडी जाळे तयार करुन मासे पकडले जातात. विशिष्ट पध्दत अशासाठी म्हणायचे की, जाळ्यातील एकेका अटकावाचा आकार एवढा असतो की यात विशिष्ट वयाचाच, विशिष्ट आकाराचाच मास अडकेल. व लहान मासे, की जे अजुन पुर्ण वाढलेले नाहीत ते पुन्हा नदी-धरणात जातात. म्हणजे नैसर्गिक प्रजनन प्रक्रियेवर फारसा परिणाम न करताही मावळातील सुज्ञ लोक मांसाहार करीत होते. आजही अशा पध्दती आपणास पहावयास मिळतात. हे नाते देखील, वाढत्या शहरीकरणामुळे , दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातींसारखेच, नष्ट होण्याचा मार्गावर आहे. व हेच खरे कारण आहे, सह्याद्रीच्या होत असलेल्या –हासाचे.