Imagine your child conquering the highest peak in the Pune region—Torna Fort, standing tall at 4603 ft. This December 16th, we invite your kids, aged 12 and above, to join us on an exciting guided hike to Torna Fort, a journey that promises both learning and fun. Hike to Torna Fort with Nisargshala Dear Parents, Imagine your child conquering the highest peak in the Pune region—Torna Fort, standing tall at 4603 ft. This December 16th, we invite your kids, aged 12 and above, to join us on an exciting guided hike to Torna Fort, a journey that promises both learning and fun. Key Details: Destination: Torna Fort Difficulty Level: Medium Trek Lead: Yashdeep Malwade – A certified mountaineer with extensive experience. Stay: Nisargshala Camp Cost: Rs. 1600 per head Adventure Add-ons (Optional at Extra Cost): 1. Rappelling: Experience the thrill of descending a 50ft rock cliff – Rs. 1000 per attempt. 2. River Crossing: Navigate the waters – Rs. 600 per head. Pick up & Drop Off Point: Opp Maratha Mandir, Bavdhan, Pune Inclusions: Guided Hike Non-AC bus transport from Pune Camping at Nisargshala 2 Breakfasts 2 Meals Morning Tea This isn’t just a trek; it’s a journey of self-discovery, resilience, and companionship. Your child will learn the basics of trekking in the scenic Sahyadri, scaling the historic Torna Fort under the guidance of our certified trek leader. To secure a spot for your child’s memorable adventure, contact us for registration at 9049002053. Spaces are limited, and we wouldn’t want your child to miss out on this incredible experience
हा तानाजी कडा खरंच कां हो इतका जीवघेणा, अवघड आहे ?काय झाले असेल नेमके अपघाताचे कारण ?" कारण,आणि खरंच असल्या प्राणघातकी छंदास, खेळ कसे समजावे आम्ही?" आणखीही बरंच काही विचारत होते तात्या. पुंडलीक सरांच्या त्या कातर झालेल्या स्नेह्यास, म्हणजे तात्यांना मी काहीबाही उत्तरे देत गेलो. पण,यापेक्षा देखील वरचढ मूर्खपणा मी काही दिवसापूर्वीच त्याच कड्यावर केला होता, हे सांगण्याचे धाडस मात्र मला झाले नाही.
क्षणक्षण धुंदल्या सारखे व्हायचे. पावलापावलावर येथील कळ्या, फुले, पाने, वेली, गवत , प्राणी नव्हे सगळी सृष्टीच एका सुमधुर संगीताच्या तालावर एका लयीत धुंद झाल्यासारखी भासत होती. आता मला सांगा ही वाट काय तुडवायची आहे?
कोणतेही महान काम तुमच्या हातुन होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विद्यापीठातुन पीएच डी घ्यावी लागत नाही. अशी पीएच डी तर सोडाच साधी पदवी, बारावी, दहावी पर्यंत देखील शिक्षण न झालेला एखादा व्यक्ति ध्येयाने पछाडल्याने आणि महानतम कर्म आपल्या हातुन व्हावे म्हणुन गेली जवळजवळ दोन तपे कष्ट उपसत आहे. मनुष्य जन्माने, धनसंपत्तीनेच मोठा होतो असे नाही तर कर्माने देखील तो श्रेष्ठत्व प्राप्त करुन घेऊ शकतो याचे जिवंत म्हणजे आजच्या आपल्या या प्रेरणादायी कथेचे, अस्सल जिंदगीतील नायक आहे. या हिरोची जीवनकथा व त्याचे त्याच्या धेयाप्रती समर्पण पाहिले की तुम्हाला माझ्या या लेखातील पहिल्या वाक्याचे सत्यता पटेल. आपल्या या नायकाचे नाव आहे लाल. एखाद्या सिनेमातील कथा वाटावी इतकी रंजक, करुण, दुखःद जरी असली तरी ही कथा सत्य आहे. प्रत्यक्ष घडली आहे. सकारात्मक बदल होऊ शकतात, एखादा मनुष्य आंतर्बाह्य बदलु शकतो, तो नुसता स्वतःच बदलत नाही तर त्याच्याकडुन महान असे इहलोकी महान असे काम ही होऊ शकते, त्याच्या कडून अनेकजण प्रेरणा देखील घेऊ शकतात; अशा सा-या शक्यतांना पुन्हा एकदा रान मोकळे करुन देणा-या लालचा जन्म कोल्हापुरातील एका अगदी छोट्याशा खेड्यात झाला. याचे वडील वनखात्यात रखवालदार म्हणुन केवळ दोन रुपये मजुरीवर नोकरीला होते. त्यामुळे तीन मुलांच्या त्यांच्या संसारात काटेच काटे होते. स्वतःच्या मालकीची शेतजमीन देखील अगदीच कमी असल्याने व कोरडवाहु असल्याने त्यातुन काहीही हशील होत नव्हते. लालच्या जन्मानंतर हे कुटुंब त्यांच्या दानोळी या गावातुन तमदलगे या गावाजवळील वनक्षेत्रात राहण्यासाठी गेले. आपल्या हिरोच्या नकळतच त्याच्यावर इतक्या लहान वयात जंगलांचे संस्कार सुरु झाले.सोबत चौथीपर्यंत शिक्षण देखील याच गावातील शाळेत झाले. सुटीच्या दिवशी वडीलांसोबत जंगलात, वनीकरणात काम करावे लागायचे. त्या काळी रोप बनवण्यासाठी ज्या प्लास्टीकच्या काळ्या पिशव्या मजुरांकडुन मातीने भरुन घेतल्या जात त्याची मजुरी तुम्ही ऐकाल तर थक्क व्हाल. शंभर पिशव्या मातीने भरुन दिल्यावर एक रुपया मजुरी मिळायची. आपला हिरो देखील वडीलांना त्यांच्या कामात मदत करायचा. कधी पिशव्या भरण्यासाठी तर कधी घायतळाची रोपे जमा करण्यासाठी , तर कधी डोंगर उतारावर मातीच्या ताली बांधण्यासाठी. तब्बल चार वर्षे तमदलगे तील जंगलात वास्तव्य करुन हे कुटुंब पुन्हा मुळ गावी आले. इकडे पाचवीला शाळेत प्रवेश घेऊन शाळेत जाऊ लागलेला लालचे मन मात्र जंगलात रमायचे. त्याला शाळेत जे शिक्षक होते त्यांचे नाव शेडबाळे सर. एकदा शाळेत जायला उशिर झाला म्हणुन शेडबाळे सरांनी मागेपुढे न पाहता लालच्या कानशिलात लगावली. लाल ला हा फटका अगदी वर्मी बसला. त्या दिवसापासुन लाल ने पुन्हा कधीही शाळा पाहिली नाही. जशी त्याने शाळेकडे पाठ फिरवली तसेच शाळेने, शेडबाळे सरांनी देखील कधीही त्याला पुन्हा शाळेत आणण्यासाठी प्रयत्न नाही केला. शेडबाळे सरांमुळे लालची शाळेशी, शिक्षणाशी नाळ तुटली ती कायमचीच. मग काय लाल बेफान सुटला. प्रत्येक गावात असतात तशी टुकार टवाळ माणसांचा वारसा त्याला मित्रमंडळींमुळे कधी लाभला हे त्यालाच काय पण त्याच्या कुटुंबाला देखील समजले नाही. शिक्षण सुटल्यापासुन वैवाहिक जीवन सुरु होईपर्यंत लाल होत्याचा नव्हता झाला होता. योग्य-अयोग्य, नीती-अनीती यांचा कसलाही विचार न करता मिळेल त्या मार्गाने, जसे जमेल तसे, जितके जमतील तितके पैसे कमाविणे हाच त्याचा नेम होता. गाडी रुळावरुन इतकी फाफलत गेली की लाल आता चक्क दारु गाळण्याचा व्यवसाय करु लागला. आज इतक्या वर्षांनी जेव्हा लाल ला याबाबत विचारले तर ते म्हणतात की स्वार्थ आणि मोह मनुष्याला माणुसपण सोडुन वागायला नेहमीच प्रेरीत करीत असतात. संयमाचा अभाव, मोठ्यांचा अनादर, कशाचीही परवा न करणे अशा कारणांमुळे नकळतच कधी ते वाममार्गाला लागले ते त्यांचे त्यांना सुध्दा समजले नाही. लग्न झाले, दोन मुली घरात हसु-रडु लागल्या, खेळु लागल्या. तो काळ पाहता मुलगा व्हायलाच पाहिजे असा हट्ट न करता, एका अर्थने वाम मार्गाला गेलेला लाल मात्र माणुस म्हणुन अजुनही ठाम होता. दोनच मुलींवरच समाधान मानणा-या लालच्या आयुष्याला मात्र पुढे वेगळेच वळण लागणार होते. अनुचित मार्गाचा शेवट नेहमी कुणालाही न आवडणा-या ठिकाणीच होतो. तसेच लालचे देखील झाले. मोठी मुलगी दिड वर्षांची तर छोटी मुलगी फक्त दिड महिन्यांची असताना लाल सांगलीच्या कारागृहात बंदिवान झाला. जेल मध्ये असतानाम, जे काही दिवस शिक्षा  भोगली त्या दिवसांत तावुन सुलाखुन निघालेल्या सोन्यासारखा लालमधे आंतरिक बदल झाला. तो इतका झाला की चक्क जेल मध्ये असतानाच त्याच्या हातुन जेल मधील डझनभर झाडे तुटण्यापासुन वाचली. इलेक्ट्रीकच्या तारांना लागत असल्याने ही भली मोठी झाडे तोडण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला. व त्याप्रमाणे ते काम सुर होणार इतक्यात लाल जेलर साहेबांना म्हणाला की साहेब ही झाडे कापु नका, आपण त्याच्या तेव्हड्याच फांद्या फक्त छाटु ज्या वीजेच्या तारांला लागतात. पण जेलर साहेबांना ही कल्पना जरी आवडली असली तरी ती प्रत्यक्षात करण्यासारखी नाही याचीदेखील त्यांना कल्पना होती. त्यामुळे जेलर साहेबांनी झाडे तोडली जाणारच असे ठरविले. कारण ही झाडे खुपच ऊंच होती. एका अर्थाने हे सारे महान वृक्ष होते. कदाचित शेकडो वर्षे ते ठामपणे त्याच जागी उभे असतील. लाल ला ही अडचण जशी समजली तसे लाल ने जेलर साहेबांना कळवले की लाल स्वतः झाडांवर चढुन फांद्या छाटण्याचे काम करील, ते ही पुर्णपणे त्याच्या स्वतःच्या जबाबदारीवर. जेलर साहेबांनी यावर विश्वास ठेवुन होकार दिला. ही घटना २००१ ची आहे. हल्लीच म्हणजे डिसेंबर २०२० मध्ये लाल जेव्हा या कारागृहाच्या बाजुने , खानभागच्या रस्त्याने जात होते तेव्हा त्यांना ती सारी झाडे दिसली. म्हणजे लाल ने जे काही केले त्यामुळे ते महावृक्ष अजुनही दिमाखात उभे आहेत. त्याम्च्या अंगाखांद्यावर शेकडो हजारो पक्ष्यांची घरटी आहेत. शेकडो लोकांना सावली देणारी ही झाडे आजही जिवंत आहेत याचे बहुंशी श्रेय लाल ला जाते. तुरुंगातील शेवटच्या दिवशी त्याला घरी नेण्यासाठी त्याची पत्नी आणि दोन्ही मुली आल्या. त्या चिमुकल्या दोन्ही मुलींना पाहुन, लाल ने मनाचा निश्चय केला की पुन्हा वाममार्गाला लागायचे नाही. पुढे काय करायचे, कुठे जायचे, घर कसे चालवायचे असे काहीही माहित नव्हते पण मनाचा निश्चय मात्र पक्का होता. म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग असतोच. मार्ग नसला तरी ही सृष्टी तुमच्या निश्चयामुळे तुमच्यासाठी मार्ग तयार करतेच. काहीसे असेच झाले पुढे. स्वतःच्या गावी वाट्याला आलेल्या थोड्याशा शेतात काम सुरु केले. सोबतीला शेळीपालन सुरु केले. अपार कष्ट केले. पण हाताची आणि पोटाची जुळवणी करताना परवड व्हायचीच. आर्थिक बाजु अजुन कच्ची होत गेली. अशातच एका ओळखीतील एका सदगृहस्थाचे पुण्याजवळील पानशेत येथे एक फार्महाऊस असुन त्या फार्म हाऊस ची देखभाल, राखण, तेथे वृक्षारोपण अशा कामांसाठी या गृहस्थाला एका माणसाची गरज होती. लाल ने लागलीच हो म्हंटले व २००३ मध्ये लाल कुटुंबासमवेत पुण्याजवळील पानशेत येथे येऊन राहु लागला. बालपणातच जंगलकडु (बाळकडु म्हणतात ना तसे जंगलकडु) मिळालेले असल्याने लाल ने फार्महाऊस चे रुप पालटुन टाकले. छोट्याशा जागेत त्यांनी पन्नास झाडे लावली व जगविली. लाल चे मालक एक अभ्यासु तसेच पर्यावरणाविषयी आस्था असणारे गृहस्थ. त्यांना वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण, देवराई, दुर्मिळ देशी वृक्षांचे संरक्षण व संवर्धनाची आवड आहे. फार्म हाऊस च्या या मालकाने केवळ स्वतःचे फार्म हाऊसच सांभाळले असे नाही तर पानशेत परीसरात पर्यावरण संरक्षण, संवर्धनासाठी देखील सेवाभावी वृत्तीने कार्य
रम्य त्या आठवणी आमचाच नव्हे तर आपणा प्रत्येकाच्याच भुतकाळातील काही भाग आपणास, प्रत्येकास रम्य वाटतो. आपणास आपला तो तो भुतकाळ पुनःपुन्हा जगावासा वाटतो, हवाहवासा वाटतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही वर्षे असतात जेव्हा आपण ख-या अर्थाने जगलेलो असतो, असे आपणास आत्ता वाटते. त्या काळातील आपले ते जगणे, आपल्या वर्तमान काळात देखील आपणास जगण्याची आणि ख-या अर्थाने जगण्याची प्रेरणा नक्कीच देत राहते. आणि जेव्हा त्या आठवणी फोटो व डायरीच्या माध्यमातुन पुन्हा समोर येतात तेव्हा तर आपण टाईम ट्रॅव्हलच करतोय की काय असे वाटल्या शिवाय राहत नाही. आमच्या सुदैवाने आमच्या आयुष्यातील ‘तो’ रम्य काळ, तो सुवर्णकाळ थोड्याबहुत का होईना पण डायरीत लिहिलेला, फोटोंमध्ये चित्रीत केलेला आहे. ईष्टापत्ती यावी तसा कोरोना आलेला आहे. या आपत्तीतुन आपण आपापले कोर्स करेक्शन करावे. आपापले ध्येय पुनर्निश्चित करावे. आपापले सखे-सोयरे पुन्हा नव्याने ओळखावेत, आपले आयुष्य आपण नक्की कसे जगले पाहिजे याचे चिंतन करावे. कदाचित आपोआपच यशदिपकडुन जुने बाड धुंडाळणे सुरु झाले असावे. एकेक खजिना सापडावा तसे एकेका ट्रेकचे फोटो, लिखित वृत्त सापडत आहे. मलाही माझे काही जुने लेख, ट्रेक-वृत्तांत, फोटो सापडले. आपल्यापैकी अनेकांना काहीनाकाही सापडले आहेच. आमच्या साठी आमचा ट्रेकिंगचा तो काळ म्हणजे सुवर्णकाळ होता. नुकतीच बारावी होऊन मी संगणक शास्त्र या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. कॉलेज सांगवीला असल्याने जाणे-येणे अवघड होते. एकही बसमार्ग नव्हता. टु व्हीलर (माझ्या वडीलांची एम-८०) घरी असुनही व चालवता देखील येत असुन तिने प्रवास करण्यासाठी परवानगी नव्हती वडीलांची. मग सपकाळ सर व जगदीश गोडबोले यांच्या माहितीतुन विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहाविषयी माहिती मिळाली व तिथे प्रवेश घेतला. गावाकडुन शहरात रहायला गेलेला मी न्युनगंडाने ग्रासलेलो होतो. वर्गातील एक दोन मित्र मंडळी सोडली तर माझे फारसे कुणाशी कधीही जमले नव्हते. माझे मन रमायचे ते डोंगरद-यांमध्ये. असे होण्याचे आणखी एक कारण होते, ते म्हणजे माझी ट्रेकिंगचे सवंगडी. सवंगड्यांतील काही चेहरे बदलत राहिले. पण तीन जण मात्र कायम होते. ते म्हणजे यशदीप, देवीदास व मी. त्याकाळात आम्ही तिघांनी अनेक ट्रेक एकत्र केले. आमच्या सोबत कधी माझे मित्र असत तर कधी यशदिपचे मित्र असत. असाच आमचा आणखी एक ट्रेक म्हणजे सांकशी-माणिकगड-कर्नाळा-अलिबाग! यशदिप ने तेव्हा लिहुन ठेवलेल्या डायरीत या ट्रेकचे वृत्त देखील सविस्तर आहे. यशदिप इतक्या बारक्याने सगळ्या गोष्टी लिहित असे हे मला माहित असले तरी नंतरच्या काळात मी ते विसरुन गेलो होतो. पण लॉकडाऊन च्या काळात त्याने हा खजिना पुन्हा शोधुन त्याच्या या विशिष्ट गुणावर साचलेले मळभच जणु दुर केले आहे. मला देखील लिहायची आवड होती, आहे. पण इतक्या बारकाव्याने लिहिणे मला कधीही जमले नाही. कुठे, किती वाजता, कोण-कोण, स्थानिकांच्या नावासहीत त्याने हे जे काही लिहिले आहे ते कायमस्वरुपी संग्रही ठेवावे असेच आहे. आमचा हा ट्रेक झाला तो एकुण पाच दिवसांचा. काय ते दिवस मित्रांनो. हल्ली पाच दिवसांचा ट्रेक करणे निव्वळ दिवास्वप्न होईल. अशी इतक्या जास्त दिवसांच्या ट्रेकची कल्पना देखील हल्ली करवत नाही. कॉलेजांना दिवाळीच्या सुट्या लागल्या होत्या. देवीदासचा नेहमीचा फॉर्मुला होता नोकरीमध्ये ड्युट्यांचे जुगाड करण्याचा. मला देखील वसतिग्रुहात जाऊन एक वर्ष झाले होते. त्यामुळे होस्टेलचा एक मित्र प्रकाश जाधव हा देखील सहभागी झाला होता. सोबतचा त्याचा चुलत भाऊ अतुल होता. असे आम्ही पाच जण. माझ्या साठी अतुल नवीन होता तर यश व देवा साठी प्रकाश व अतुल अनोळखी होते. पण ट्रेक संपताना आम्ही सारेच घट्ट मित्र होऊन गेलो होतो. ट्रेकिंगची हीच खासियत असते. २६ ऑक्टो ते ३० ऑक्टो १९९८ असे पाच दिवस आम्ही भटकत होतो. पहिल्या दिवशी मला विशेषत्वाने आठवते आहे ती दर्गा. आम्हाला जायचे होते सांकशी गडावर. हा एक साधारण गड होता. गावापासुन साधारण दोन तास चालुन आम्ही जेव्हा गडाच्या पायथ्याशी आलो तेव्हा अचानक ही दर्गा समोर दिसु लागली. त्याकाळी मला प्रश्न पडला की अशी दर्गा, इतक्या दुर, दुर्गम भागात कशी काय असु शकते व ती देखील सर्व सोईसुविधांनी युक्त अशी. दर्ग्यापासुन किल्ला अजुनही थोडा ऊंच होता. रात्री तिथे मुक्काम करुन आम्ही दुस-या दिवशी पहाटे गडमाथा गाठला. यशदिप ने या गड-भटकंती विषयी लिहिलेले वाचण्यासारखे आहे. यशदिपची बारकावे पाहण्याची व नोंद करण्याची क्षमता यातुन दिसते. दर्ग्यापासुन गडमाथा गाठण्यासाठी एक सरळ चढाई करावी लागते. गडावर पाहण्यासाठी काय काय आहे हे देखील यशदिप ने लिहिले आहे. या गडमाथ्यावरील यशदिपने काढलेला आमचा एक फोटो सांकशी गड पाहुन आम्ही मोर्चा वळवला माणिकगडाकडे. सांकशी पासुन माणिकगडापर्यंतच्या पायपीतीमध्ये एक सुंदर नदी लागली. त्या नदीच्या काठावर, तरीही थोडे दुर आम्ही दुपारच्या जेवणासाठी चुल मांडुन भात रांधला होता . भात शिजेपर्यंत नदीमध्ये मनसोक्त डुंबण्याचा आनंद देखील आम्ही घेतला. मित्रांनो लक्षात ठेवा असे अनोळखी प्रदेशात नदीमध्ये उतरणे धोक्याचे असते. त्यामुळे असे करणे चुकीचे आहे याची जाणिव आम्हाला नंतर झाली. त्यामुळे तुम्ही असे करणे टाळा. आज जेव्हा मी यशदिपचे हे लिखाण वाचले तेव्हा मला समजले की आम्ही त्याकाळी किती बिनधास्त जीवन जगत होतो. आम्ही दुस-या रात्री माणिकगडावर पोहोचलोच नाही मुक्कामी. किल्ल्याच्या पायथ्यालाच , खुपच जास्त अंधार पडल्याने आम्ही चक्क जंगलातच, एका भात खाचरातच मुक्काम केला. बिनधास्त असलो तरीही आम्ही आळीपाळीने जागरण करण्याचे कामही केले. त्यातच यशदिपची झोप एकदम सावध. जर्रा कुठे खुड्ड झाल की यशदिप उठुन बसतो. आणि मी त्याच्या एकदम विपरीत. अंथरुन असो वा नसो, कुठेही पाठ टेकली रे टेकली की लगेचच मी गाढ झोपी गेलेलो असतो. मला खाड-खुड अशा कशानेच जाग येत नाही. त्यामुळे जागरणाची माझी पाळी असताना देखील यशदिपच जागा होता, हे त्याच्या कडून मला प्रत्येक ट्रेकच्या अशा बिनधास्त मुक्कामानंतरच्या सकाळी समजायचे. असे बिनधास्त तरीही सावध मुक्काम आम्ही खुप केले आहेत. भिमाशंकरच्या घनदाट अरण्यातील मुक्काम, कोकणातुन वर चढुन आल्यावर भिमाशंकरच्या पायथ्याशी असलेल्या जंगलातील मुक्काम, सवाष्णी घाटातील जंगलातील मुक्काम, कैलास गडावरील मुक्काम, प्रचित गड जंगलातील मुक्काम, मोरघळीचा मुक्काम असे अनेक मुक्काम मनःपटलावर अंकित झालेले आहेत. माणिकगडाच्या वाटेविषयी यशदिप ने आवर्जुन लिहिले आहे की हेमंतने वाट चुकवली. वाटा शोधण्यासाठी वाटा चुकाव्या लागतात, त्यामुळे अनेकदा यशदिपच्या लिखाणात हेमंत ने वाट चुकवली असे लिहिलेले आढळते. याचे कारण असे की वाट शोधण्याचे काम पहिले करायला मीच पुढे सरसावुन जायचो. अनेकदा चुकायचे, वाट सापडायची नाही. आणि कधी कधी सापडायची देखील. पण उत्साह मात्र कधीही कमी व्हायचा नाही. वाट शोधण्यात मी अनेकदा चुकलो असलो तरी माझ्या सवंगड्यांनी कधीही माझ्या अविश्वास दाखवुन मला पुढे जाण्यापासुन रोखले देखील नाही. एकमेकांवर विश्वास ठेवणे, ते ही कठीण प्रसंगी खुप महत्वाचे असते. व असे धडे शिकण्याचे आमचे विद्यापीठ होते निसर्गातील अशी ही भटकंती. या ट्रेकच्या दरम्यान क्रिकेट वर्ल्ड-कप च्या मॅचेस सुरु होत्या. त्या दिवशी भारताची एक मॅच होती. देवाचा निम्मा जीव ट्रेक मध्ये तर निम्मा मॅच मध्ये होता. टॉस कुणी जिंकला असेल, बॅटींग कुणी केली, किती रन केले असतील, असे झाले असेल तसे झाले असेल अशा नाना कॉमेंट-या ट्रेकदरम्यान आम्ही ऐकत होतो. माणिकगडची चढाई, गड पाहणी, तेथील स्वयंपाक व देवाची (देवीदास ववले) क्रिकेट साठीची तगमग